मुंबई, दि. 16 : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली असून महागाई भत्ता 139 टक्क्यांवरुन142 टक्के करण्यात आला आहे.
महागाई भत्ता 1 जानेवारी 2018पासून लागू होणार असून 1ऑक्टोबर 2018 पासून या महागाई भत्त्याची वाढ रोखीने देण्यात येणार आहे. दि. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर, 2018 या 9 महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश राज्य शासन निर्गमित करणार आहे.