अहमदनगर ( संतोष पडवळ) : महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये पक्षादेश डावलून भाजपला मतदान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. तर जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवण्यात आले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ही माहिती दिली.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाने दिला असताना, तो डावलण्यात आला. त्यानंतर पक्षाच्या वतीने त्यांना सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटिशीद्वारे दिली होती; परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षानं कारवाई करत, १८ नगरसेवकांची हकालपट्टी केली. तर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कोणतीही कल्पना दिली नाही किंवा घडलेल्या घटनेबाबत कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळं विधाते यांना पदावरून हटवण्यात आले, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांची हकालपट्टी
