ठाणे

भरारी पथकाने पकडले दोन लाख दहा हजार रुपये

भिवंडी – ता ८ ;विधानसभा निवडणूक २०१९ चे आचारसंहिता लागू झाल्यानंतर भिवंडी शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मोहन नळदकर यांनी दिले आहेत. याकरता विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. या पथकामार्फत २६ सप्टेंबर रोजी रोख दहा लाख आणि ३० सप्टेंबर रोजी २० लाख पकडण्यात आले होते. आता ८ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास रोख रक्कम २ लाख १० हजार असे पकडण्यात आले आहेत, असे एकूण आतापर्यंत जमा झालेली रक्कम ३२ लाख १० हजार जप्त करण्यात आलेली आहे.

मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चाविंद्रा तपासणी नाका येथे शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना वाहन क्रमांक एम एच ४८ एके ३७८६ सफेद एरटिगा मारुती कार या वाहनांची तपासणी केली असता यामध्ये रक्कम रुपये २ लाख १० हजार रुपये आढळून आले याबाबत वाहन चालकाकडे चौकशी केली. त्यावेळी वाहन चालकाने या रकमेबाबत कोणत्याही प्रकारा समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे १३७ भिवंडी पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मोहन नळदकर यांनी ही रक्कम जप्त करून भिवंडी उपकोषागार स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही रक्कम जमा करण्यात आली आहे. याकामी अचारसहिंता नोडल अधिकारी पंढरीनाथ वेखंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आचारसहिता व्यवस्थापन प्रमुख सुभाष झळके, एफएसटी पथक क्रमांक एकचे पथक प्रमुख मंगेश राजाराम गोरे, सहाय्यक पथक प्रमुख महेंद्र मोहिते, पोलीस कर्मचारी संजय कोळी इत्यादी आचारसहिंता पथकाने ही कारवाई केली. आचारसंहिता लागू झाल्याने नागरिकानी, व्यापाऱ्यांनी नियमानुसार रुपये पन्नास हजार जवळ ठेवावी, रुपये ५० हजार रकमेपेक्षा जास्त रक्कम घेऊन फिरू नये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास त्याबाबतची कागदपत्र जवळ बाळगावी असे, आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर नळदकर यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!