तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. तेरावी विधानसभा ही १० नोव्हेंबर २०१४ रोजी अस्तित्त्वात आली होती. ९ नोव्हेंबर रोजी पाच वर्षे पूर्ण होत असल्याने विधानसभेचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार आहे. घटनात्मक तरतुदीनुसार त्यापूर्वी नवं सरकार अस्तित्त्वात येणं आवश्यक आहे. सरकारचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही तासच शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरीत कालावधीत जर नवे सरकार अस्तित्वात आले नाही तर, घटनात्मक पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे एक तांत्रिक बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला राजीनामा
November 8, 2019
96 Views
1 Min Read

-
Share This!