कल्याण, ता २६ (संतोष पडवळ) : कोरोनाच्या काळातील दि.२२मार्च ते ८ जून या काळात महाराष्ट्र टाळे बंदी झाली यामुळे अनेक जण बेरोजगार झाले ,अनेकांच्या पगारात २५ते५० टक्के कपात करण्यात आली याच काळात वीज वितरण कम्पनी ने भरमसाठ बिले ग्राहकांना पाठवली त्याचे आकडे बघून सामान्य माणसाला घाम फुटला याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सह अनेक राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , ऊर्जा मंत्री यांच्या सोबत बैठक घेतल्या त्या प्रत्येक वेळी वीज बिलात नागरिकांना दिलासा देऊ अशी आश्वासन दिले सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः राज्यपाल यांची भेट घेऊन याबद्दल चर्चा केली होती.परन्तु २० जानेवारी२०२१ रोजी महावितरण नी सवलत देण्यास नकार देऊन वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले.
त्यामुळे अश्या भूमिकेमुळे नागरिकांची मानसिक आघात करणारे व आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी कट रचन्या विरोधात ऊर्जा मंत्री नितीन राऊत व सचिव याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुका अध्यक्ष जयवंत मांजे यांनी मनसे केली आहे यासंदर्भात निवेदन देण्यासाठी जिल्हा सचिव राकेश वारघडे उपजिल्हाध्यक्ष दिलीप भोपत राव विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विजय भेरे तालुका सचिव जयवंत भोईर,ग्रामपंचायत सदस्य विकी जयवंत मांजे उपस्थित होते